Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चाय से ज्यादा किटली गरम! लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी करावी लागली धडपड; हेमांगीची पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Hemangi Kavi
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारीला निधन झाले आणि त्यांच्या पार्थिवावर दादरमधील शिवाजी पार्क येथे अंत्य संस्कार करण्यात आले. दरम्यान त्यांच्या चाहत्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठीच्या मोठी रांग लावल्याचे दिसले. दीदींवरील प्रेम आणि त्यांच्या नसण्याचे दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि भरलेल्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. दरम्यान या रांगांमध्ये अनेक सेलेब्रिटी कलाकारांचा देखील समावेश होता. होय. त्यांपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. याबाबत व्यक्त होताना हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची चर्चा सर्वत्र आहे. दरम्यान या पोस्टनंतर नेहमीप्रमाणे भयंकर ट्रोलिंग झाले असले तरीही चर्चा मात्र हेमांगीने लिहिलेल्या आणि व्यक्त केलेल्या त्या क्षणांची आहे. पाहूया हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलं आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुक पोस्ट करत लिहिले कि, परवा मयूर अडकरच्या post वर खरंतर विचारलेल्या प्रश्नावर मी comment केली. मला आलेला अनुभव share केला. स्वतंत्र post लिहिली नाही. त्या comment मध्ये ही मी गायक जे हिंदीत प्रसिद्ध आहेत शान, मिका सिंग, शैलेंद्र सिंग, कैलास खेर, कविता पौडवाल, मराठीतले गायक बेला शेंडे, नंदेश उमप यांना जवळून दर्शन मिळावं म्हणून खूप प्रयत्न करावे लागले जे सहजरित्या मिळू शकत होतं हे नमूद केलंय. यात कुठेही पोलिसांनी bollywood, हिंदी आणि मराठी असा फरक केला नाही. आणि जर केला असेल तर तो फरक bollywood किंवा हिंदीत काम करणाऱ्यांनी केला का? तर नाही! पोलिसांना वाटलं अमुक अमुक लोकांना पाठवायला हवं, त्यांच्या मनाला वाटलं त्या लोकांनाच सहजपणे शेवटचं दर्शन घेऊ दिलं. किंवा त्यांच्यासाठी तशी सोय करण्यात आली असावी. हिंदीतल्या लोकांना आत सोडा आणि मराठील्या लोकांना नको असा काही criteria त्यांनी केला नाही. थोडक्यात मेरे मन को भाया….

माझी कलाकार म्हणून ओळख पटून ही हिंदीतल्या लोकांनी नाही तर मराठी असलेल्या आणि ओळखत असलेल्या मराठी पोलिसांनी मला आत जाण्यास मनाई केली. ही चूक हिंदी bollywood ची? Srk नसेल म्हणाला ना या मराठी लोकांना आत सोडू नका बरं. राजकारण क्षेत्रातील आणि शासकीय मंडळींमुळे, त्यांच्या सुरक्षा कारणांमुळे मनाई केली. बरं त्यात ही या लोकांसाठी वेगळी सोय केली असताना सर्व gates वर मनाई केली. ती का केली हे पोलिसच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. प्रयत्नांती आत गेल्यावर पाहिलं तर तिथले पोलिस हिंदीतल्या गायक मंडळींना सुद्धा सतत मागे जाऊन बसायला सांगत होते आणि या हिंदी गायकांना ही शेवट पर्यंत थांबूनच ठेवण्यात आलं.

हिंदीतल्या the विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर लाही इतर bollywood अभिनेत्यांसारखा थेट प्रवेश दिला नाही थांबवून ठेवलं. उशिराने आलेल्या आमिर खान, त्याची मुलगी, रणबीर कपूर, शंकर महादेवन यांना मात्र आमच्या अगदी बाजूने थेट आत सोडण्यात आलं. त्यामुळे सगळाच सावळा गोंधळ होता. Covid मुळे तशी ही फार गर्दी नव्हती. सगळे सौजन्याने वागत होते. शांतीपूर्ण वातावरण होतं. सहज दर्शन मिळू शकलं असतं. पण नाही. तुम्ही कुणीही celebrity असला तरी आता तुम्हांला जाऊ देणार नाही म्हणत दोन महिला पोलीस अधिकारी एकमेकींना टाळी देत हसल्या.

तिथे काही हिंदीतल्या कलाकारांना जाऊ दिलं आणि आम्हांला पुन्हा अडवलं तेही मराठी पोलिसांनी! यात चूक त्या हिंदी कलाकारांची??? गोष्ट जेव्हा भांडणापर्यंत पोचली तेव्हा आम्हांला लताजींच्या पार्थिवाजवळ जाऊ देण्यास वाट मोकळी झाली. पार्थिवाजवळ पोचल्यावर ना कुणी अडवलं ना हटकलं. अगदी घरच्या मंडळींप्रमाणे दर्शन घेऊ दिलं. हवा तितका वेळ थांबू दिलं! मंगेशकर कुटुंबियांसोबत उभं केलं. पण gate पासून ते इथपर्यंत जो काही प्रकार झाला तो म्हणजे ‘चाय से ज्यादा किटली गरम’ हाच होता! मी या प्रकाराकडे वरून आलेले आदेश पोलीस पाळत होते आणि सरकारी protocols याच अर्थाने पाहिलंय.

पोलिसांनी हिंदी मराठी दोन्ही गायक कलाकारांपेक्षा नेते मंडळी, शासकीय लोकांना झुकतं माप दिलं गेल्याचं दिसलं हे मात्र तेवढंच खरं! कलाकारांच्या भावनेपेक्षा नेते मंडळींची सुरक्षा महत्वाची वाटली याला bollywood कसं जबाबदार? बाकी काल सर्व प्रसार माध्यमांमध्ये माझ्या एका comment मधून त्यांना हवा तो अर्थ काढून ‘मराठी कलाकारांना डावलण्यात आलं’, प्रवेश दिला नाही’ वगैरेच्या बातम्या तयार झाल्या त्याचं हे explanation!

Tags: Facebook PostFuneral Of Lata MangeshkarHemangi KaviLata Didi Last RitesSocial Media TrollingViral Facebook Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group