हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडची क्वीन आणि गेल्या काही दिवसांपासून सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौत आजकाल मुंबईपासून दूर आहे आणि ती आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा ताजेतवाने करीत आहे. नुकतंच कंगणाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून ती म्हणते की तिला मुंबईतील घोडेस्वारीची खूप आठवण येतेय. कंगनाने तिच्या घोडेस्वारीची अनेक छायाचित्रे चाहत्यांसाठी शेअर केली आहेत.
या छायाचित्रांसह अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुंबईबद्दल मला सर्वात जास्त आठवण येणारी गोष्ट म्हणजे दररोज सकाळी रेसकोर्सवर घोड्यावर बसणे होय. मी कधीही खेळाडू नव्हते परंतु माझा घोडा मला खूप आवडतो. आमच एकमेकांसमवेत राहणे आनंददायक अनुभव आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने ‘तेजस’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आदल्या दिवशी कंगनाने चित्रपटाचे दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांना जेवणाचे आमंत्रण दिले. याशिवाय कंगना सतत वादात घेरत असते. कोणत्याही विषयावर बोलणे टाळण्याचा ती प्रयत्न करीत नाही. बीएमसी विरुद्ध कंगना हा मुद्दाही खूप चर्चेत होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’