Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्वातंत्र्य झालं, गांधीजी झाले आता कंगनाचा मोर्चा कोणत्या दिशेला?; नव्या पोस्टमधून सूचक भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 20, 2021
in फोटो गॅलरी, महाराष्ट्र, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आजकाल एकामागोमाग एक अशी काही वक्तव्य करत आहे ज्यामुळे ती आपसूकच चर्चेचा विषय होत आहे. अलीकडेच कंगनाने “१९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती’ असं वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे संपूर्ण देशभरातून तिला रोष पत्करावा लागत आहे. यानंतर हा वाद चांगलाच उफाळला असताना विक्रम गोखलेंनी दिलेल्या समर्थनाने कदाचित कंगना चांगलीच हुरळली आणि तिने थेट राष्ट्रपिता गांधीजींवर देखील निशाणा साधला होता. अशातच आता स्वातंत्र्याचा मुद्दा बाजूला सारून तिने खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्यावर एक भडक पोस्ट केली आहे. शुक्रवारी सकाळी केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर तिने नाराजी व्यक्त केली होती आणि आता यानंतर कंगनाने लगेच खलिस्तानवादी दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य करीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संबंधित भूमिकेचे कौतुक केले आहे. या पोस्टमध्ये तिने इंदिरा गांधी यांचा फोटोदेखील शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने फेसबुकवर हि पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, खलिस्तानी दहशतवादी आज आपल्या सरकारचे हात पिरगळण्याचा प्रयत्न करत आहे….पण एका महिलेला विसरू नका… या एकमेव महिला पंतप्रधानांनी त्यांना आपल्या चपलेखाली चिरडलं होते….. त्यांनी (खलिस्तानी) या देशाला कितीही त्रास दिला असला तरी ….. त्यांनी (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) जीवाची बाजी लावून त्यांना डासासारखे चिरडले आहे…. पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत….त्यांच्या मृत्यूनंतरही…. आजही त्यांच्या नावाने हे प्रकरण ओळखले जाते… त्याला एकच गुरू आहे… #repeaalfarmlaws… खलिस्तानी चळवळीच्या उदयाप्रमाणे त्यांची कहाणीदेखील नेहमीपेक्षा अधिक समर्पक झाली आहे…..खूप लवकरच तुमच्यासाठी #Emergency आणत आहे.

 

आता कंगनाची हि समर्पक पोस्ट पाहता तिने कृषी कायद्यांच्या मुद्द्याला लांब दाखवून जवळून हात घातला आहे का काय? असे वाटते आहे. इतकेच नव्हे तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर केलेला कौतुकाचा वर्षाव शेतकऱ्यांच्या मुद्द्यात काँग्रेसला अप्रत्यक्षपणे भूमिका घ्या असे कंगनाला सांगायचे आहे का काय? असेही वाटत आहे. कारण अलीकडेच कंगनाने तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. याबाबत तिने व्यक्त होताना लिहिले होते कि, “दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचं आहे… संसदेत बसणाऱ्या सरकारऐवजी आता रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागलेत, तर हाही जिहादी देश आहे… अभिनंदन. जे हे सर्व करु इच्छितात.

Tags: Ex PM Of IndiaFacebook Postindira gandhiKangana Ranautviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group