हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । आपल्या सततच्या विधानाने नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर टीका केली आहे. या चित्रपटाबाबत कंगनाने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. कंगनाने ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीचा खरपूस समाचार घेत त्यांना जीनियस म्हणणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. याशिवाय कंगनाने पुन्हा एकदा करण जोहर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यावर ताशेरे ओढले.
कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ब्रह्मास्त्रचे नेगेटिव रिव्यू शेयर करत निर्मात्यांना खोटे ठरवले आहे. रिव्ह्यू शेअर करताना कंगनाने लिहिले – जेव्हा तुम्ही खोटे बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे होते. करण जोहर प्रत्येक शोमध्ये लोकांना हे सांगण्यास भाग पाडतो की आलिया भट्ट आणि रणबीर हे सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत आणि अयान मुखर्जी एक प्रतिभावान आहे. आणि लोकांचा यावर हळूहळू विश्वासही बसू लागला आहे. या चित्रपटाचे 600 कोटींचे बजेट आणखी काय सांगते, ज्या दिग्दर्शकाने आयुष्यात एकही चांगला चित्रपट बनवला नाही. या चित्रपटाच्या निधीसाठी फॉक्स स्टुडिओला स्वतःला विकावे लागले. आणि या चित्रपटांमुळे अजून किती स्टुडिओ बंद होतील.
कंगनाने तिच्या पुढच्या स्टोरी मध्ये लिहिले – जे अयान मुखर्जीला जीनियस म्हणतात त्यांना ताबडतोब तुरुंगात पाठवले पाहिजे. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांना 12 वर्षे लागली, 14 डीओपी बदलले, 400 दिवसांपेक्षा जास्त काळ चित्रपट शूट केला, 85 सहाय्यक दिग्दर्शक बदलले आणि 600 कोटी उडवले. त्याचवेळी शेवटच्या क्षणी चित्रपटाचे नाव बदलल्याने धार्मिक भावना दुखावल्या. अशी संधीसाधू माणसे, अशा सर्जनशीलतेपासून वंचित असलेली माणसे, यशाची भुकेली माणसे, त्यांना हुशार म्हंटले तर दिवसाला रात्र आणि आणि रात्रीला दिवस म्हणावा लागेल अशी ही एक विचारी युक्ती आहेअसेही कंगनाने म्हंटल.
Discussion about this post