Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शेवंता.. बस नाम ही काफ़ी है; चॅनल, प्रोडक्शन आणि सहकलाकारांवर आरोप लावीत अपूर्वाने सोडली मालिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 25, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रात्रीस खेळ चाले’ ही झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका असून यातील अण्णा, शेवंता, माई, पांडू, सुसल्या ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. कोकणातील मातीशी संबंध असलेली हि मालिका अनेकांना आपली वाटू लागली. यामुळे मालिकेवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले. यातील अण्णा नाईक आणि नाईकांची शेवंता चांगलीच गाजली. शेवंताची भूमिका मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारली आहे. शेवंताने आपल्या मोहक आणि लक्षवेधक सौंदर्याच्या बळावर भल्याभल्यांना वेड लावलं. पण आता अपूर्वा या मालिकेत दिसणार नाही. अर्थात मालिकेतील शेवंता बदलणार आहे. याचे कारण काय हे अपूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट करीत सांगितले आहे. तिने इंस्टावर ३ पानी नोट जाहीर करीत मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

या पोस्टमध्ये अपूर्वाने लिहिले की, ” शेवंता बस नाम ही काफी है पर कभी कभी इतना ही काफी नही होता’ आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते त्या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधान वाटले. खरं सांगायचं तर शेवंताचे सादरीकरण हे मला सहज जमत गेले. जणू काही ती शेवंताची चेतना आजवर मी जगत आले. त्या भूमिकेमधले नाविन्य त्या व्यक्तिरेखेत विविध पैलू निराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली खूप काही देऊन गेली. असे सर्व काही छान घडत असताना आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल की, असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला. मला माझ्या सोशल मीडियावर कमेंट, ईमेलमधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्याचे उत्तर देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे आणि या गोष्टीचा उलगडा करणं हे माझं कर्तव्य समजून याचा खुलासा मी करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

शेवंता या भूमिकेसाठी मी दहा किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर त्या काही निगेटिव्ह कॉमेंट आल्या. त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबन केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट तर मला जिव्हारी लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केल्या गेल्या. त्याबद्दल व त्यावर कारवाई केल्यानंतर ही संबंधित नव्या कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. तुम्हाला माहीतच आहे की मालिकेचे शूटिंग सावंतवाडीत सुरू आहे. मी मुंबईवरून बारा तासाचा ट्रेनने प्रवास करून जात होते. मला शूटिंग करता बोलवल्यानंतर फक्त एक दिवस शूट करून नंतर तीन ते चार दिवस काहीच शूट केले जात नव्हतं. असं महिन्याभरात केवळ सहा ते सात दिवस काम लागत होतं आणि त्याकरता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

प्रोडक्शन हाऊस कडून मला सांगण्यात आलं होतं की, तिसरा सीजनसाठी तुमचे आम्हाला पाच ते सहा दिवस लागणार आहेत म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनल कडून मला आणखी एक शो देण्याचं आश्वासन देण्यात आले. परंतु पाच ते सहा महिने झाले अद्याप ती आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे. असाच प्रकार गेल्या वर्षी सुद्धा झी युवा वरील ‘तुझं माझं जमतय’ या मालिकेच्या वेळी देखील घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनलकडून एकही पैसा बुडणार नाही असं आश्वासन दिलं गेलं होतं. अद्याप पर्यंत चेक मिळाला नाही आणि ते सुद्धा आश्वासन पाळले गेले नाही.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनलला एकनिष्ठ राहून काम केलं परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मिळालाच नाही आणि माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर मला ही मालिका सोडावी लागली. हे दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझ्या वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथे थांबले नाही आणखीन काही नवीन रोज मी करत राहील. आपल्या प्रेमाचा वर्षाव सदैव होत राहील अशी मी आशा करते. हीच माझी एकच प्रेरणा आहे.. अशी पोस्ट अपूर्वा नेमळेकरने खंत व्यक्त करीत लिहिली आहे.

Tags: Apurva NemlekarInstagram PostRatris Khel Chaleviral postzee marathiZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group