Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विशाल दादलानीने पुन्हा साधला भाजपावर निशाणा,म्हणाला “काय साहेब… ”

tdadmin by tdadmin
March 4, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड संगीत दिग्दर्शक आणि गायक विशाल दादलानी याने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने शनिवारी महाराष्ट्र सरकारकडे औरंगाबादचं नाव बदलावे यासाठी मागणी केली. भाजपाने औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. या वरुनच विशालने भाजपावर निशाणा साधत सत्ता जाताच यांनी सर्कस सुरु केल्याचा टोला लगावला आहे.

विशाल दादलानीने ट्विट करत म्हटलं आहे की, “पाच वर्ष यांचे सरकार होते तेव्हा तर नाव बदललं नाही. आणि आता सत्तेतून बाहेर येताच यांची सर्कस सुरु झाली आहे. काय साहेब…लोक मूर्ख वाटले का?”.

5 years in power, but no name change.

A few months out of power, and the circus begins.

काय, साहेब? लोक मूर्ख वाटते का? https://t.co/oo80B0rL5O

— VISHAL DADLANI (@VishalDadlani) March 2, 2020

आम्ही औरंगजेबाचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “औरंगाबादच्या नामकरणा संदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल आहे. त्या याचिकेच्या सुनावणीच्या प्रक्रियेला गती देऊन शहराचं नाव बदलले गेले पाहिजे.आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा महाराष्ट्राचा शत्रू होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे”.

Tags: BollywoodMusic DirectorViral PhotoViral VideoVishal Dadlaniविशाल दादलानी
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group